मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अंदाजे 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केले.
Related News
Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटमधून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Vikram-1 Launch यशस्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
सकाळी कोमट पाण्यात मध पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिसळून पिणे हा...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका’, पत्नी गीतांजली यांची सफदरजंग रुग्णालयाला विनंती
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
या धक्कादायक घटनेनंतर घरमालक अशोक नामदेवराव बोळे (वय अंदाजे 60) यांना ताणामुळे
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर हातगाव गावासह मूर्तिजापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असला तरी चोरट्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नाही.
मूर्तिजापूर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे व घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता व भीती पसरली असून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चोरटे जणू पोलिसांना खुलेआम आव्हान देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या घटनेनंतर पोलिस प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव वाढला असून,
स्थानिक नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यासाठी सतर्क गस्त,
सीसीटीव्ही यंत्रणा व विशेष पथक स्थापनेची मागणी केली आहे.