विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला
आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट
घेतल्यानंतर त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. आज त्यांनी
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
यावर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राम राम करत शरद पवारांची
पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर
मध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांची
लेक अंकिता पाटील यांनीही त्यांचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी आपण
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर
केले होते. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप
कडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणे यांनी
हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. भाजपा प्रवेशानंतर हर्षवर्धन
पाटील यांना निवडणूकीत यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांनी या पराभवाचा
वचपा काढण्यासाठी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यकर्त्यांना सज्जड दम
हर्षवर्धन पाटील यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना या राजकीय घडामोडींमध्ये
कोणावरही टीका न करता, सोशल मीडीया मध्ये माहिती नसताना काहीही लिहू
नका असं म्हणत आगामी विधानसभेच्या कामाला लागा असं म्हटलं आहे.
आता इंदापूरचा राजकीय वनवास संंपवायचा आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-likely-to-contest-150-to-160-seats-patil/