Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला.
टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं.
हे कसं ते समजून घ्या.चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा किताब टीम इंडियाने जिंकला आहे.
Related News
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. भारताने आपल्या विजयासह पाकिस्तानला तीन दु:ख दिली.
टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माजी क्रिकेटपटुना कसं उत्तर दिलं? ते जाणून घेऊया.
तिथले क्रिकेटर्स सतत भारताविरोधात वक्तव्य करत होते.
पहिलं दु:ख
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता.
पण त्यांना आपलं विजेतेपद कायम राखता आलं नाही.पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही.
आता भारताने अंतिम सामना जिंकून त्यांच्या जखमेवर मोठी चोळलं. 2017 साली पाकिस्तानी टीमने भारताला फायनलमध्ये हरवलं होतं.
पण आता भारताने फायनल जिंकून आपणच क्रिकेट विश्वातील चॅम्पियन असल्याच दाखून दिलय.
दुसरं दु:ख
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारतामुळे पाकिस्तानला दुबईत खेळावं लागलं.
तिथे भारताने त्याना 6 विकेटने हरवलं. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं.
भारताकडून पराभूत झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं.
तिसरं दु:ख
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने जोरदार झटका दिला होता. पाकिस्तानला आपल्या देशातच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवायची होती.
यासाठी ते अडून बसलेले. पण बीसीसीआय समोर त्यांना झुकावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच आयोजन हायब्रिड मॉडलच्या बेसवर झालं होतं.
टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळले. शेवटी विजेतेपद मिळवलं.
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या दोन स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
पण टुर्नामेंटमध्ये त्यांची टीम साखळी फेरीतच गारद झाली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chicken-khanano-jara-sambhun-bird-flu-baddal-central-government-9-raja-kalam-alert/