मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित
नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा
दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या
हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण
राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या
वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशा
शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिला
आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर
होणार आहे. त्याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून
सरकारला घेरलं आहे. आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली
नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण
तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो. मला आणि माझ्या
मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर
दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर
तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट
लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ
आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय
देऊ शकता, असं मनोज जरांगे म्हणाले. जसे तुम्ही आता
कोणाचीही मागणी नसताना 16- 17 जाती आरक्षणात घातल्या.
तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतलं.
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते
करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट
होतील की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही अशा
शब्दात जरांगेंनी इशारा दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/oath-ceremony-of-mla-appointed-as-governor-of-maharashtra/