तात्काळ आर्थिक मदत आवश्यक

तात्काळ

पातुर तालुक्यात शेतकरी संकट: अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, प्रशासनाकडे त्वरित मदतीसाठी विनंती

पातुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने रवि सोनोने यांनी माहिती दिली की, नदीकाठच्या आणि नाल्याकाठच्या शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मुंग, कापूस यांसह इतर पिकांची तब्बल हानी झाली आहे.शेतकऱ्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती असून, या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या गंभीररीत्या प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे झाले असूनही त्यांना अद्याप त्वरित आर्थिक मदत मिळालेली नाही. सतत पाऊस आणि नद्यांचे पूर यामुळे पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने हा अर्ज पालकमंत्री , जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाला सविनय सादर केला असून, पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे, पंचनाम्यांवर आधारित नुकसान भरपाई देणे आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रुपचे सदस्य रवि सोनोने,ज्ञानेश्वर गाडगे, सदाशिव घोरे, राहुल ताले ,विनोद कडाळे, प्रकाश काळे ,देवेंद्र उपर्वट, शिवाजी वसतकार ,शालिग्राम राऊत, सुपेश उपर्वट, गणेश ताले, गोपाल सोनोने, योगेश राऊत,विजय बोचरे ,संतोष दुतोंडे ,मुस्तहीन बेग यांनी  शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मागणी केली आहे.

शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे आग्रह धरला आहे की, सतत पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक आणि मानसिक आधार मिळावा. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन वाचवता येईल आणि भविष्यातील संकटांपासून संरक्षण मिळू शकेल.

read also : https://ajinkyabharat.com/govind-barge-suicide-case/