मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासमारीची वेळ आली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मंगळवार बाजार, देवरन रोड, रेल्वे स्टेशन रस्ता आणि विठ्ठल मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवर व हातमजुरी करणाऱ्यांवर ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे. दरम्यान, अपंग व्यक्तीने आपल्या पोटाची खोटी भरण्यासाठी थोडी जागा अडवून व्यवसाय सुरू केला होता. मात्र कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने त्याचे दुकान उद्ध्वस्त केले. आता त्याच्याकडे ना पर्याय आहे, ना मदतीचा हात!
खाजगी व्यवसायिकांना अभय, गरीब पांगळा उघड्यावर!
दुसरीकडे शहरातील मोठे हॉटेल्स, बार, बँका आणि व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण केले गेले असूनही, प्रशासन त्यांच्यावर हात घालत नाही. त्यांच्या समोरील दुचाकींच्या रांगा, अन्न विक्रीच्या स्टॉल्स, मिनी बारचे प्रकार – याकडे नगर परिषद डोळेझाक करत आहे. ही एकतर्फी भूमिका आता लोकशाहीच्या नावावर कलंक बनत चालली आहे.
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
शहरात प्रश्न – अपंगांना जगायचा हक्क नाही का?
दिवसेंदिवस शहरातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात अपंग व आर्थिक दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायाने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे.
ही मोहीम म्हणजे केवळ बळीचा बकरा शोधण्याचे साधनच?
यापूर्वी सुद्धा प्रशासनाने केवळ काही दिवस मोहीम राबवून ‘दिखावा’ केला होता आणि नंतर अतिक्रमण पूर्ववत झाले. त्यामुळे यंदाची मोहीमही केवळ गोरगरिबांवर धडका घालण्यासाठीच की काय, असा संशय उपस्थित होत आहे.
सवाल हाच – प्रशासनाच्या नजरा शक्तीवर आणि न्यायाच्या व्याख्येवर पुन्हा विचार व्हायला हवा का?