‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे सृष्टीचे कौतुक असले, तरी पावसाळ्या बरोबरच
अनेक आजारही येत असतात किंवा आधीच आजारी असलेल्या लोकांना
अधिक काळजी घ्यावी लागत असते. पावसाळ्यात विशेषतः मधुमेहग्रस्तांना
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील अति दमटपणामुळे
अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण जाते.
उष्णता आणि हवेतील ओलावा यांमुळे जी आर्द्रता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम
आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. अति दमटपणामुळे तणाव वाढतो
आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हा ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे;
ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे
मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते; ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.
अति दमटपणामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे तुम्हाला शरीराची
हालचाल करण्याची इच्छा होत नाही आणि एका जागी बसून राहावेसे वाटते.
कमी शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
हे अजूनही सिद्ध झालेले नाही; पण काही पुरावे सांगतात की, दमट वातावरणामुळे
शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेनशची समस्या निर्माण होते.
जेव्हा शरीरातील पेशींना रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यास अडचण जाणवते
तेव्हा शरीराला आणखी इन्सुलिनची आवश्यकता भासते. दमटपणामुळे जेव्हा तुम्ही
औषधी घेत नाही तेव्हा त्याचा थेट परिणाम रक्तातील साखर नियंत्रणेवर होतो आणि
रक्तातील साखर अचानक वाढते. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी याबाबत
तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती. दमटपणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे
खूप कठीण जाते. पण, रक्तातील साखरेच्या पातळीविषयी आपल्या आरोग्यतज्ज्ञाला
नियमित माहिती देणे आणि त्याविषयी आवश्यक सल्ला घेणे गरजेचे आहे.
चांगला संतुलित आहार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-visits-poland-and-ukraine/