‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे सृष्टीचे कौतुक असले, तरी पावसाळ्या बरोबरच
अनेक आजारही येत असतात किंवा आधीच आजारी असलेल्या लोकांना
अधिक काळजी घ्यावी लागत असते. पावसाळ्यात विशेषतः मधुमेहग्रस्तांना
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील अति दमटपणामुळे
अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण जाते.
उष्णता आणि हवेतील ओलावा यांमुळे जी आर्द्रता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम
आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. अति दमटपणामुळे तणाव वाढतो
आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हा ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे;
ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे
मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते; ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.
अति दमटपणामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे तुम्हाला शरीराची
हालचाल करण्याची इच्छा होत नाही आणि एका जागी बसून राहावेसे वाटते.
कमी शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
हे अजूनही सिद्ध झालेले नाही; पण काही पुरावे सांगतात की, दमट वातावरणामुळे
शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेनशची समस्या निर्माण होते.
जेव्हा शरीरातील पेशींना रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यास अडचण जाणवते
तेव्हा शरीराला आणखी इन्सुलिनची आवश्यकता भासते. दमटपणामुळे जेव्हा तुम्ही
औषधी घेत नाही तेव्हा त्याचा थेट परिणाम रक्तातील साखर नियंत्रणेवर होतो आणि
रक्तातील साखर अचानक वाढते. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी याबाबत
तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती. दमटपणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे
खूप कठीण जाते. पण, रक्तातील साखरेच्या पातळीविषयी आपल्या आरोग्यतज्ज्ञाला
नियमित माहिती देणे आणि त्याविषयी आवश्यक सल्ला घेणे गरजेचे आहे.
चांगला संतुलित आहार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-visits-poland-and-ukraine/