गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गावंडे यांचे अकस्मित निधन झाले आहे.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शोकाकुल नातेवाईक व गावकरी मंडळींना नाल्याच्या पाण्यातून जावे लागले,
ही अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गावात पायाभूत सुविधांचा अभाव
असल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळीही लोकांना पाण्यातूनच जावे लागले
जास्त पाणी असल्यास तर परिस्थिती आणखी बिकट,
पाण्याचा प्रवाह वाढतो, वाटेचा पत्ता हरवतो,
शेवटी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना जीव मुठीत धरून
कमरेच्या वर असलेल्या पाण्यातून अंत्यसंस्कारासाठी जावे लागते.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ स्मशानभूमीपर्यंत
रस्ता व पुलासाठी मागणी करत आहेत,
पण यंत्रणा नेहमीप्रमाणे “होईल… पाहू…”
इतकंच उत्तर देत आली आहे.
आज गरज आहे ती केवळ पूल किंवा रस्ता नव्हे,
तर माणुसकीच्या दृष्टीकोनाची…
मृत्यू हा शेवट असतो, पण त्या शेवटाचा सन्मान असायला हवा.
गावकऱ्यांनी आवाज
“मरण यातना संपवा, स्मशानभूमीपर्यंत सन्मानाचा रस्ता द्या!”