अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या
धोकादायक वळणावर ८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.
बहिरमहून संग्रामपूरकडे जाणारी एमएच 28 बीडब्ल्यू 0145 क्रमांकाची चारचाकी गाडी
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
वळणावरून थेट रस्त्याच्या कडेला उतरून नाल्यात पडली. गाडी नाल्यातून पलटी होऊन शेतात गेली,
मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या मित्रपरिवाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.
पहिल्या नजरेत हा अपघात पाहून काहींनी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला.
मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली गेली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
वणी वारुळा येथील वळण हा अत्यंत धोकादायक असून, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.
रात्रीच्या वेळी या वळणावर वाहन चालवणे कठीण होते, ज्यामुळे चालकांचा ताबा सुटून अशा दुर्घटना घडतात.
प्रशासनाने या वळणावर उपाययोजना करून अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सदर अपघातानंतर पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
वाहन संग्रामपूर येथील असल्याचे उघड झाले आहे. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,
नागरिकांनी अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, धोकादायक वळणांवर अधिक प्रकाश व्यवस्था व आवश्यक संकेतस्थळे बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/one-person-seriously-injured-after-being-attacked-by-a-stranger-treatment-started-immediately/