अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या
धोकादायक वळणावर ८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.
बहिरमहून संग्रामपूरकडे जाणारी एमएच 28 बीडब्ल्यू 0145 क्रमांकाची चारचाकी गाडी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
वळणावरून थेट रस्त्याच्या कडेला उतरून नाल्यात पडली. गाडी नाल्यातून पलटी होऊन शेतात गेली,
मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या मित्रपरिवाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.
पहिल्या नजरेत हा अपघात पाहून काहींनी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला.
मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली गेली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
वणी वारुळा येथील वळण हा अत्यंत धोकादायक असून, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.
रात्रीच्या वेळी या वळणावर वाहन चालवणे कठीण होते, ज्यामुळे चालकांचा ताबा सुटून अशा दुर्घटना घडतात.
प्रशासनाने या वळणावर उपाययोजना करून अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सदर अपघातानंतर पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
वाहन संग्रामपूर येथील असल्याचे उघड झाले आहे. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,
नागरिकांनी अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, धोकादायक वळणांवर अधिक प्रकाश व्यवस्था व आवश्यक संकेतस्थळे बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/one-person-seriously-injured-after-being-attacked-by-a-stranger-treatment-started-immediately/