सध्या ओडिशासह , पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ‘दाना’
चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. त्या पार्श्वभूमीवर
किनारपट्टीच्या भागांत सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
असून अनके नागरिकांना स्थलांतरितही करण्यात आलं आहे.
ओदिशातही चक्रीवादळाचा कहर दिसत असून याचदरम्यान लाखो
लोकांचीही सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
याचदरम्यान ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी
महत्वाची पण एक गुड न्यूज दिली आहे. दाना चक्रीवादळामुळे
आरोग्य केंद्रात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांपैकी
1,600 महिलांनी मुलांना जन्म दिल्याचे त्यांनी नमूद केले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 5,84,888
लोकांना धोक्याच्या भागातून हलवण्यात आले आहे. ही संख्या
आणखी वाढू शकते. हलवण्यात आलेले हे नागरिक 6 हजारापेक्षा
अधिक चक्रीवादळ निवारागृहात राहत आहेत, जिथे त्यांना अन्न,
औषध, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत, असे
मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बालासोर जिल्ह्यातून सर्वाधिक लोकांचे
स्थलांतर करण्यात आले, तेथे 1 लाख 72 हजार 916 लोकांना
सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर मयूरभंज येथे 1 लाख
लोकांना हलवण्यात आले. याशिवाय भद्रकमधून 75 हजार,
जाजपूरमधून 58 हजार आणि केंद्रपारा येथून 46 हजार लोकांना
सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली
आहे. आम्ही हाय रिस्क असलेल्या भागातून सर्व लोकांना
यशस्वीरित्या बाहेर काढले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित
शाह यांना राज्यातील तयारीबद्दल माहिती दिली. ओडिशा सरकारने
उचललेल्या पावलांवर केंद्राने समाधान दर्शवलं आहे. दरम्यान
आदल्या दिवशी, कटक जिल्ह्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात
आलेल्या एका महिलेने नियाली रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क (I&PR) विभागाने
याची घोषणा केली होती. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर
आश्रयस्थानात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांमध्ये
त्या महिलेचा समावेश होता.
Read also: https://ajinkyabharat.com/disabled-and-elderly-voters-can-vote-from-home/