सध्या ओडिशासह , पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ‘दाना’
चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. त्या पार्श्वभूमीवर
किनारपट्टीच्या भागांत सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली
Related News
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
असून अनके नागरिकांना स्थलांतरितही करण्यात आलं आहे.
ओदिशातही चक्रीवादळाचा कहर दिसत असून याचदरम्यान लाखो
लोकांचीही सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
याचदरम्यान ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी
महत्वाची पण एक गुड न्यूज दिली आहे. दाना चक्रीवादळामुळे
आरोग्य केंद्रात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांपैकी
1,600 महिलांनी मुलांना जन्म दिल्याचे त्यांनी नमूद केले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 5,84,888
लोकांना धोक्याच्या भागातून हलवण्यात आले आहे. ही संख्या
आणखी वाढू शकते. हलवण्यात आलेले हे नागरिक 6 हजारापेक्षा
अधिक चक्रीवादळ निवारागृहात राहत आहेत, जिथे त्यांना अन्न,
औषध, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत, असे
मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बालासोर जिल्ह्यातून सर्वाधिक लोकांचे
स्थलांतर करण्यात आले, तेथे 1 लाख 72 हजार 916 लोकांना
सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर मयूरभंज येथे 1 लाख
लोकांना हलवण्यात आले. याशिवाय भद्रकमधून 75 हजार,
जाजपूरमधून 58 हजार आणि केंद्रपारा येथून 46 हजार लोकांना
सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली
आहे. आम्ही हाय रिस्क असलेल्या भागातून सर्व लोकांना
यशस्वीरित्या बाहेर काढले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित
शाह यांना राज्यातील तयारीबद्दल माहिती दिली. ओडिशा सरकारने
उचललेल्या पावलांवर केंद्राने समाधान दर्शवलं आहे. दरम्यान
आदल्या दिवशी, कटक जिल्ह्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात
आलेल्या एका महिलेने नियाली रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क (I&PR) विभागाने
याची घोषणा केली होती. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर
आश्रयस्थानात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांमध्ये
त्या महिलेचा समावेश होता.
Read also: https://ajinkyabharat.com/disabled-and-elderly-voters-can-vote-from-home/