मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानं
निदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू
करण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्यासाठी
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू
लागू करण्यात आला आहे, तर थौबलमध्ये भारतीय नागरी संरक्षण
संहिता च्या कलम 163 (2) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात
आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की,
“जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळं, कर्फ्यू
शिथिल करण्यासंबंधीचे पूर्वीचे आदेश १० सप्टेंबर रोजी सकाळी ११
वाजल्यापासून तात्काळ प्रभावानं रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळं पुढील
आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने इंफाळमधील पूर्व जिल्ह्यात कर्फ्यू लागू
करण्यात आला आहे.” इंफाळ पश्चिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या
आणखी एका आदेशात म्हटले आहे की, आधीचे सर्व आदेश रद्द करून
१० सप्टेंबरसाठी कर्फ्यूमधील शिथिलता आज सकाळी ११ वाजल्यापासून
रद्द करण्यात आली आहे. तसेच, गेल्या वर्षी १ सप्टेंबरपासून लोकांच्या संबंधित
निवासस्थानाच्या बाहेर जाण्यावरील बंदी उठवण्यात आली होती, असं आदेशात
म्हटलं आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी कर्फ्यू शिथिलता पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत होती,
परंतु नवीन आदेशात हे हटविण्यात आले आहे. मात्र, मीडिया, वीज, न्यायालये
आणि आरोग्य यासह अत्यावश्यक सेवा कर्फ्यूच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.
डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास
असमर्थ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. थौबलमध्ये कर्फ्यू लागू असल्यानं
पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कारण पोलिसांनी
दावा केला आहे की, सोमवारी जिल्ह्यात निदर्शक विद्यार्थ्यांपैकी एकानं गोळीबार
केला आणि एक पोलीस जखमी झाला. दरम्यान, विविध शाळा आणि महाविद्यालयांतील
शेकडो विद्यार्थ्यांनी इंफाळमधील खवैरामबंद महिला मार्केटमध्ये उभारलेल्या शिबिरांमध्ये रात्र काढली.