काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती
खालावली आहे. रविवारी जम्मूमधील जसरोटा विधानसभा
मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान ते बेशुद्ध पडले.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
यानंतर त्यांना काही मिनिटांसाठी भाषण थांबवावे लागले. त्यानंतर
त्यांनी उभे राहून 2 मिनिटे भाषण केले. ‘मी 83 वर्षांचा आहे.
मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही,’ असा दावाही
यावेळी खरगे यांनी केला. खरगे यांना रुग्णालयात दाखल
केल्यानंतर काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.
कर्नाटक सरकारचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा
प्रियांक खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या
वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. प्रियांकने आपल्या
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘जम्मू-काश्मीरच्या जसरोटा येथे एका
जाहीर सभेला संबोधित करताना वडील मल्लिकार्जुन खर्गे यांना
थोडे अस्वस्थ वाटले. वडिलांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली
आहे. शरीरात रक्ताची पातळी थोडी कमी आढळली आहे. यानंतर
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत
आहे. सर्वांच्या काळजीबद्दल मी खूप आभारी आहे. त्याची जिद्द
आणि लोकांच्या शुभेच्छा त्याला खंबीर ठेवतात.’
प्रकृती खालावल्यानंतर खरगे यांनी सभेला संबोधित करताना
सांगितले, राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आम्ही लढू. मी 83
वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान मोदी
सत्तेबाहेर होईपर्यंत मी जिवंत असेन. तथापी, मोदी सरकारवर
निशाणा साधत खरगे म्हणाले, ‘या लोकांना कधीच निवडणुका
घ्यायच्या नव्हत्या. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात
निवडणुका घेता आल्या असत्या. त्याला लेफ्टनंट गव्हर्नरच्या
माध्यमातून रिमोट कंट्रोल्ड सरकार चालवायचे होते.
Read also: https://ajinkyabharat.com/salil-deshmukh-uddhav-thackerays-bhetila/