काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती
खालावली आहे. रविवारी जम्मूमधील जसरोटा विधानसभा
मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान ते बेशुद्ध पडले.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
यानंतर त्यांना काही मिनिटांसाठी भाषण थांबवावे लागले. त्यानंतर
त्यांनी उभे राहून 2 मिनिटे भाषण केले. ‘मी 83 वर्षांचा आहे.
मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही,’ असा दावाही
यावेळी खरगे यांनी केला. खरगे यांना रुग्णालयात दाखल
केल्यानंतर काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.
कर्नाटक सरकारचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा
प्रियांक खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या
वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. प्रियांकने आपल्या
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘जम्मू-काश्मीरच्या जसरोटा येथे एका
जाहीर सभेला संबोधित करताना वडील मल्लिकार्जुन खर्गे यांना
थोडे अस्वस्थ वाटले. वडिलांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली
आहे. शरीरात रक्ताची पातळी थोडी कमी आढळली आहे. यानंतर
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत
आहे. सर्वांच्या काळजीबद्दल मी खूप आभारी आहे. त्याची जिद्द
आणि लोकांच्या शुभेच्छा त्याला खंबीर ठेवतात.’
प्रकृती खालावल्यानंतर खरगे यांनी सभेला संबोधित करताना
सांगितले, राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आम्ही लढू. मी 83
वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान मोदी
सत्तेबाहेर होईपर्यंत मी जिवंत असेन. तथापी, मोदी सरकारवर
निशाणा साधत खरगे म्हणाले, ‘या लोकांना कधीच निवडणुका
घ्यायच्या नव्हत्या. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात
निवडणुका घेता आल्या असत्या. त्याला लेफ्टनंट गव्हर्नरच्या
माध्यमातून रिमोट कंट्रोल्ड सरकार चालवायचे होते.
Read also: https://ajinkyabharat.com/salil-deshmukh-uddhav-thackerays-bhetila/