राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील रामगड मतदारसंघातील
काँग्रेस आमदार जुबेर खान यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.
अनेक दिवसांपासून आजारी असलेले आमदार जुबेर खान यांनी पहाटे
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
5.50 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजस्थान
विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या आता 65 झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जुबेर खान हे अलवर जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघातून
काँग्रेसचे आमदार होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर
उपचार सुरू होते. आमदार जुबेर खान यांनी आज पहाटे 5.50 वाजता
अलवरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी
साफिया जुबेर यांनी दिली. साफिया जुबेर या राजकारणातही सक्रिय आहेत.
झुबेर खान यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
ते एक अनुभवी आणि समर्पित नेते होते, ज्यांनी अलवर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत
करण्यात भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक राजकीय
नेत्यांनी झुबेर खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. झुबेर खान यांना ट्वीट करून
श्रद्धांजली वाहताना अशोक गेहलोत म्हणाले की, झुबेर खान यांचे निधन हे पक्षाचे
कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आमदार जुबेर खान यांच्या निधनाने राजस्थान
विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या 65 झाली आहे. 200 सदस्यांच्या विधानसभेत
आता एकूण सात जागा रिक्त आहेत, त्यापैकी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या
आमदारांच्या राजीनाम्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या एका आमदाराचाही
नुकताच मृत्यू झाला. जुबेर खान यांच्या निधनामुळे पक्ष आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.