चोहोट्टा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत समाधान शिबिर आणि जनसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात रक्तदान शिबिरदेखील आयोजित करण्यात आले, ज्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
फेरफार व रस्ता अदालत,जिवंत सातबारा मोहीम
कार्यक्रमादरम्यान फेरफार अदालत, रस्ता अदालत आणि जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली.देवर्डा येथील शेतातील पाण्याचा बांध सामूहिक प्रयत्नाने मोकळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्रे दिली गेली.याशिवाय, १५ सातबारे, २० जात प्रमाणपत्र, १० उत्पन्न दाखले, १० ग्रामपंचायत संबंधित दस्तऐवज नागरिकांना वितरित केले गेले.कार्यक्रमात नागरिकांना जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिनल सर्टिफिकेट, अधिवास व उत्पन्न दाखले मान्यवरांच्या हस्ते दिले गेले.
आरोग्य व विविध योजनांची माहिती
कार्यक्रमात आरोग्य, पुरवठा, भूमी अभिलेख, पंचायत समिती, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, रजिस्ट्रेशन ऑफिस, बचत गट, कृषी व महावितरण विभाग यांचे स्टॉल्सही ठेवण्यात आले. नागरिकांना विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली.
१५० शेतरस्ते अतिक्रमणमुक्त – सीमांकन मोहिमेत गती
तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी सांगितले की, चोहोट्टा बाजार मंडळातील १५० शेतरस्त्यांचे सीमांकन करून त्यांना अतिक्रमणमुक्त करण्याची व्यापक मोहिम सुरू करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक सोपी होईल आणि रस्त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होईल.
प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आमदार रणधीरभाऊ सावरकर.यासह उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, सह दुय्यम निबंधक श्रेणी 1 अकोट नितीन कुलकर्णी, नायब तहसिलदार सोनोने सर, नायब तहसीलदार मनोज मानकर, नायब तहसीलदार सुधीर थेटे, गटविकास अधिकारी वानखडे मॅडम, भूमिअभिलेख अधीक्षक सोनलाल पालवे, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळातील सर्व सरपंच उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार सुधीर थेटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी अतुल वानखडे यांनी मानले.
शिबिर यशस्वी – नागरिकांचा मोठा सहभाग
चोहोट्टा बाजार मंडळाचे अधिकारी विशाल शेरेकर, ग्राम महसूल अधिकारी महेश सरकटे, अतुल वानखडे, गणेश धात्रक, सचिन चिकार, शिवराज दाभाडे, दिपाली तेलगोटे आणि महसूलमित्र किशोर राठोड, गोपाल अरबट, शिवचरण वानखडे, राजू ओवे यांनी समन्वय साधून शिबिर यशस्वी केले.मंडळातील शेकडो नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/banana-lacking-huge-humor-day/