अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
Related News
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
मात्र, आजवर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा संताप :
मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे
आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या
गावातील शिवारातील माती गोळा करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
नागपूर येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीसांनी केली अटक :
आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी नागपूरकडे निघाले
असताना मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
शेतकरी आणि त्यांच्या संघटनांचा सरकारकडे ठाम आग्रह आहे की,
दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हलका करून आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-chorratyancha-devasthanavar-halla/