Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
त्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.
सध्या महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
कारण या हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याच समोर आलं.
तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराडमुळेच आधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
तोच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप झाला होता.
पण मागच्या आठवड्यात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल झालं. त्यातून ही बाब समोर आली.
त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे फोटो समोर आले.
त्यातून अत्यंत अमानुषता दिसून आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्साठी प्रकृतीच कारण दिलय. दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांना दम भरला आहे. “चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील”
अशा इशाराच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला आहे.
भाजपाच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर निवासस्थानी बैठक घेतली.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दम भरला. त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल ही सुनावले.
‘भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा’
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच बैठक झाली. त्याचं दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले.
“तुम्ही जनतेचे मंत्री आहात आणि भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा. लोकहिताची काम आणि चांगल्या योजना शासनासाठी सुचवा”
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत. “
लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाईलवर बोलताना तारतम्य ठेवा.
चुकीचे वर्तन मंत्रीपदावर गंभीर परिणाम करेल” असा मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.