बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची
मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण
करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे,
अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह
बाबूपेठवासीयांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील
नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते.
रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव
गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे
विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून
या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू
असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत
तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी
केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली
होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे
लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा
आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. मनपाने
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा
घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/demand-to-give-bharat-ratna-to-nitish-kumar/