बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची
मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण
करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे,
अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह
बाबूपेठवासीयांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील
नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते.
रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव
गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे
विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून
या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू
असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत
तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी
केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली
होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे
लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा
आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. मनपाने
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा
घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/demand-to-give-bharat-ratna-to-nitish-kumar/