बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे तपासात स्पष्ट झाले. जळगाव जामोद पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ गाडीने वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केल्यानंतर या घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले.
ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास करताना संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (MH 28 BB 5753) गाडीकडे वळली. तपासादरम्यान ही गाडी शेगाव येथील मनीष नारायणसिंग सुर्यवंशी याची असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाच्या कटाची कबुली दिली.
Related News
कल्याण हत्याकांडातील 7 धक्कादायक खुलासे! प्रियकराची निर्घृण हत्या, मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवला
‘सिया संस्कारी आहे असं सांगितलं होतं’; केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
स्नॅपचॅट Love Story: 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरने पलटला डाव; ओडिशाहून महाराष्ट्रात आलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या निर्णयाने खळबळ
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत अडचणीत; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वी मोठी घडामोड
“13 बॅगा भरून सोनं-चांदी घेऊन गेल्या!” विनायक राऊत यांचा सुनेवर गंभीर आरोप; कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
Beed Crime 2026 : 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या! क्षुल्लक वादातून मित्रावर चाकूने 15 हून अधिक वार? अंबाजोगाई हादरली
5 मोठे दावे! विनायक राऊतांची धक्कादायक पहिली प्रतिक्रिया; सुनेच्या आरोपांवर दिलं सविस्तर उत्तर
पत्नीच्या कथित अफेअरमुळे तरुणाची आत्महत्या, दोघांवर गुन्हा : 2 महिन्यांत उद्ध्वस्त झाला संसार;
हिदायत पटेल हत्याकांडात मोठी घडामोड; अकोट सत्र न्यायालयाकडून ४ फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट
10 तासांच्या ACB धाडीत दीड कोटींची रोकड, अर्धा किलो सोनं जप्त; मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरातून धक्कादायक घबाड
केतन अग्रवाल हत्या : 7 धक्कादायक खुलासे, पॉलिग्राफ चाचणीसाठी कोर्टात पोलिसांची मोठी मागणी
Nasrapur Case Verdict 2026: मृत्युदंडानंतर सुप्रिया सुळेंची 7 कठोर मागणी; ‘भर चौकात फाशी’ची जोरदार भूमिका
तपासात समोर आले की, मृत वृषाली गावंडे यांचे पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) यांनी मिळून हा कट रचला होता. यापूर्वी वृषाली यांना अन्नातून विष देऊन मारण्याचा तीन वेळा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन गाडीने उडवून खून करण्याचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी सकाळी मनीषने वृषाली यांच्या दुचाकीचा पाठलाग केला आणि गाडीने मागून धडक देत त्यांना खाली पाडले. या धडकेत वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात वाहन चालक मनीष नारायणसिंग सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि मृत महिलेचे पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ६१(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत.
