23 एप्रिल 2025 रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतले होते.
14 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, अटारी-वाघा सीमारेषेवरील संयुक्त तपासणी चौकीवर त्यांना भारताच्या
अधिकाऱ्यांकडे शांततेने आणि प्रोटोकॉलनुसार सोपविण्यात आले .
Related News
पूर्णम कुमार शॉ हे पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात होते.
त्यांच्या चुकून सीमा ओलांडण्याच्या घटनेनंतर, भारत सरकारने पाकिस्तानकडे
त्यांच्या सुरक्षित परतफेडीसाठी उच्चस्तरीय संवाद सुरू केला . या प्रयत्नांमध्ये
“ऑपरेशन सिंदूर” या विशेष मोहिमेचा समावेश होता, ज्यामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला .
पूर्णम कुमार शॉ यांच्या पत्नी रजनी शॉ, ज्या गर्भवती आहेत, त्यांनी त्यांच्या पतीच्या वापसी साठी विविध
पातळ्यांवर प्रयत्न केले. त्यांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि पश्चिम बंगालच्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आश्वासन दिले .
पूर्णम कुमार शॉ यांच्या सुरक्षित परतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
त्यांच्या घरी मिठाई वाटप करण्यात आले आणि कुटुंबीयांनी सरकारचे आणि बीएसएफचे आभार मानले .
Read Also : https://ajinkyabharat.com/kansamidhye-urfi-javedcha-debut-udhala/
