मुंबई |
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना
(UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
यांनी रविवारी (13 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
या घडामोडीनं मुंबईतील ठाकरे गटातील असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे.
‘जय महाराष्ट्र’ म्हणत घेतला निरोप:
संजना घाडी या ठाकरे गटातील आक्रमक आणि सक्रिय नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्या अनेक वेळा न्यूज चॅनलवरील चर्चांमध्ये ठाकरे गटाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच त्यांना प्रवक्त्या म्हणून नियुक्त केलं गेलं होतं.
मात्र प्रवक्त्यांच्या यादीतील गोंधळामुळे त्या नाराज झाल्या होत्या.
प्रारंभी त्यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने आणि नंतर तातडीने समावेश केल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली होती.
शिंदे गटात दणक्यात प्रवेश:
रविवारी संजना आणि संजय घाडी यांच्यासह अनेक समर्थकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
या प्रवेशामुळे BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाच्या संघटनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
BMCपूर्वीचा धोका वाढला:
महाविकास आघाडीची ताकद असलेल्या ठाकरे गटात अशा प्रकारचं पक्षांतर होणं ही नक्कीच मोठी राजकीय घडामोड आहे.
खास करून BMC निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर संजना घाडी
यांच्यासारख्या अनुभवी नगरसेविकेचं दुसऱ्या गटात जाणं, हे ठाकरे गटासाठी गंभीर आव्हान ठरू शकतं.