बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची
हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली.
आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरू केला.
मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे
जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून
यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे, पण आंदोलकांचं रौंद्ररुप
अनुभवायला मिळालं. याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे.
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक
भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की,
देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत.
मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी
वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मला वाटतं की,
आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच, पण त्याचबरोबर
त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही
राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही, तर देशाच्या प्रत्येक भागांत
आपल्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक
कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे.
तसेच, बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचं
मला समजलं. मात्र, त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही.
थोरात कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/diabetics-should-take-care-during-rainy-season/