आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच
पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले
आहेत. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने मोर्चेबांधणी करताना दिसत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे
पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही
सुरु आहेत. त्यातच आता महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जास्त जागा
पदरात पाडण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे
महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. भाजपामध्ये
किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांची
निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र मला न विचारताच माझी नियुक्ती कशी केली? अशी विचारणा किरीट
सोमय्या यांनी पक्षाकडे केली. “मला अनेक कामं दिलेली आहेत. मोठं मोठी
काम करत आहे. म्हणूनच मी सुचवलं सगळीच काम मी करतोय, मला
कमिटी नको. पक्षाला जे पटलं त्यांनी सुधार केला. गेली साडेपाच वर्ष कोणतंही
पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून
मी काम करत आहे” असं किरीट सोमय्या म्हणाले. तर दुसरीकडे अजित पवार
यांनी अमित शाहांकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. “महायुतीने
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे.
राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह
यांच्यापुढे ठेवला. त्यामुळे महायुतीत यावरुन वाद होण्याची चिन्ह पाहायला
मिळत आहे. तसेच दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांकडून जागावाटपात
जास्तीत जास्त जागा द्या, अशी मागणी होत आहे. यामुळे यंदा विधानसभा
निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार
गट यांच्यात वाद होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/gagawat-swachhta-hi-seva-campaign-between-27th-september-to-2nd-october/