अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
भाऊसाहेब पोटे विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
NMMS परीक्षेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणून सक्षम नागरिक बनवण्याचा उद्देश आहे.
या पार्श्वभूमीवर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नावीन्यपूर्ण सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सचिव सन्माननीय डॉ. मेघनाताई पोटे यांनी भूषवले.
प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य पी. बी. रावणकार, प्रा. संदीप बोबडे, प्रा. एन. एम. भावे, संस्था संचालक अमोल तळोकार,
ज्येष्ठ शिक्षिका अर्चना उबाळे, पर्यवेक्षक श्री. पी. एम. गावंडे यांची उपस्थिती होती.
या वेळी NMMS परीक्षेत जिल्ह्यातून तिसरी आणि तालुक्यातून पहिली येण्याचा मान पटकावणारी विद्यार्थिनी
कु. श्रद्धा गजानन कांगळे, तसेच कु. राधिका मुरलीधर पांडे, कु. राधिका गोपाल खराटे, कु. मधुरा मनोज मानकर,
कु. समीक्षा विठ्ठल सावरकर, कु. समृद्धी ज्ञानेश्वर कुले, श्याम श्रीकृष्ण हरणे, सिद्धेश अनिल वडाळ,
अक्षरा संतोष पडोळे, प्रणव तिव्हाणे, प्रणव वालशिंगे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि संपूर्ण शाळा परिवाराने
अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.