Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या
आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेटनं पराभूत केलं आहे.
भारतापुढं आता पाकिस्तानंच आव्हान आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचवेळा लढत झाली आहे.
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
यामध्ये कोणता संघ वरचढ ठरलाय हे पाहिल्यास भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं.
पाकिस्ताननं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 पैकी 3 सामन्यात पराभूत केलं आहे.
भारतानं पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केलं आहे. भारतानं 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला साखळी सामन्यात पराभूत केलं.
मात्र, त्याच स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला.
भारत आणि पाकिस्तान दुबईत 28 वेळा आमने सामने आले. ज्यामध्ये पाकिस्ताननं भारताला 19 वेळा पराभूत केलं.
तर, भारतानं पाकिस्तानला 9 वेळा पराभूत केलं आहे.एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान 135 वेळा आमने सामने आले आहेत.
यामध्ये पाकिस्ताननं भारताला 73 वेळा पराभूत केलं. भारतानं पाकिस्तानला 57 वेळा पराभूत केलं आहे.
यावरुन पाकिस्तानचं वनडेमध्ये भारतावर वर्चस्व राहिल्याचं दिसून येतं. रविवारी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागल्याचं दिसून येतं.
MORE NEWS HERE