Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या
आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेटनं पराभूत केलं आहे.
भारतापुढं आता पाकिस्तानंच आव्हान आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचवेळा लढत झाली आहे.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
यामध्ये कोणता संघ वरचढ ठरलाय हे पाहिल्यास भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं.
पाकिस्ताननं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 पैकी 3 सामन्यात पराभूत केलं आहे.
भारतानं पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केलं आहे. भारतानं 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला साखळी सामन्यात पराभूत केलं.
मात्र, त्याच स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला.
भारत आणि पाकिस्तान दुबईत 28 वेळा आमने सामने आले. ज्यामध्ये पाकिस्ताननं भारताला 19 वेळा पराभूत केलं.
तर, भारतानं पाकिस्तानला 9 वेळा पराभूत केलं आहे.एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान 135 वेळा आमने सामने आले आहेत.
यामध्ये पाकिस्ताननं भारताला 73 वेळा पराभूत केलं. भारतानं पाकिस्तानला 57 वेळा पराभूत केलं आहे.
यावरुन पाकिस्तानचं वनडेमध्ये भारतावर वर्चस्व राहिल्याचं दिसून येतं. रविवारी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागल्याचं दिसून येतं.
MORE NEWS HERE