अकोला शहरात वसलेले एक अनोखे आणि पवित्र स्थळ – अंजनी माता आणि हनुमान यांचे
एकत्रित स्वयंभू मंदिर. देशात इतरत्र कुठेही न आढळणारे हे मंदिर,
अकोल्यातील मोहता मिल परिसरात स्थित असून “तपे हनुमान” या नावाने प्रसिद्ध आहे.
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साडेचारशे ते पाचशे वर्षांची प्राचीनता. प्रत्येक वर्षी येथे ह
नुमान जन्मोत्सव, रामनवमी, तसेच इतर अनेक धार्मिक सण मोठ्या श्रद्धेने
आणि उत्साहात साजरे केले जातात. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात गर्दी करतात.
“हे मंदिर खूपच पवित्र आहे. संकटात असताना आम्ही येथे येतो आणि प्रार्थना करतो.
अंजनी मातेची आणि हनुमानाची कृपा नक्कीच मिळते.”
अंजनी माता, हनुमानाची माता, ही शक्तीचे प्रतीक मानली जाते. तिची पूजा केल्याने भक्तांना धैर्य,
आत्मविश्वास आणि संकटातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात स्तोत्र,
मंत्र पठण, पूजा-अर्चा या माध्यमातून भक्त आपली भावना व्यक्त करतात.
या मंदिराचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांनाही खुला प्रवेश आहे.
म्हणूनच देशभरातून येथे भक्तगण दर्शनासाठी येतात. हे मंदिर आज अकोल्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र
म्हणून ओळखले जात असून सरकारदरबारी याला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
“हे मंदिर फक्त श्रद्धेचे नाही, तर सामर्थ्य आणि भक्तीचे प्रतीक आहे. याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास अधिक भाविकांना सुविधा मिळतील.”
तपे हनुमान मंदिर, केवळ अकोल्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आध्यात्मिक वैभव असून,
येथील भक्तीमय वातावरण श्रद्धाळूंना मन:शांती आणि आंतरिक बल देणारे ठरते.