महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून
20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा
निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली
आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या
सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. केंद्रीय निवडणूक
आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या
तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी
मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान
होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार
आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना
त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात
येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म
भरावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप,
एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका
बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि
राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-mla-rana-jagjit-singh-patlana-stagewar-radu-karpale/