राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजणार आहे.
त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून मोर्चेबांधणी सुरु आहे.
यंदाची लढाई प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ठरणार आहे.
Related News
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ...
Continue reading
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर
ही विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे.
दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राज्यामध्ये
नवीन आघाडीची घोषणा केली आहे. निवडणूकीमध्ये तिसरी आघाडी नाही
तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
बच्चू कडू हे सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत महायुतीमध्ये सामील आहे.
मात्र लोकसभेच्या निवडणूकीं आधीपासून त्यांचे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी केलेल्या शेतकरी आघाडीमुळे यंदाची विधानसभा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, “येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही,
तर शेतकऱ्यांची आघाडी असेल.
कष्टकरी, शेतकरी जे जास्त कष्ट करतात त्यांची ही आघाडी असेल.
९ ऑगस्टला संभाजीनगर येथे आम्ही सभा ठेवली आहे.
त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल,
तर त्याचं स्वागत आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच आहे,
असे मत बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू हे सध्या महायुतीमध्ये आहेत.
मात्र त्यांचे आघाडीमध्ये खटके उडत आहे.
आपली नाराजी देखील त्यांनी उघडपणे जाहीर देखील केली आहे.
लोकसभेमध्ये अमरावतीच्या जागेवरुन भाजप विरुद्ध बच्चू कडू
अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने बच्चू कडू नाराज होते.
त्यामुळे आता आगामी विधानसभेमध्ये महायुतीमधून एक्झिट घेत
नवीन आघाडी स्थापन करण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत.
शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि दिव्यांग यांच्या समस्यांवर काही मुद्दे मांडत होतो.
त्यासाठी १० ते १५ आमदार एकत्र आले.
परंतु सत्ताधाऱ्यांकडे यावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही यावेळी मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात ते पाहून निर्णय घेऊ.
Read also: https://ajinkyabharat.com/the-cut-of-capturing-the-indian-watchtower-was-revealed/