राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजणार आहे.
त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून मोर्चेबांधणी सुरु आहे.
यंदाची लढाई प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ठरणार आहे.
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर
ही विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे.
दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राज्यामध्ये
नवीन आघाडीची घोषणा केली आहे. निवडणूकीमध्ये तिसरी आघाडी नाही
तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
बच्चू कडू हे सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत महायुतीमध्ये सामील आहे.
मात्र लोकसभेच्या निवडणूकीं आधीपासून त्यांचे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी केलेल्या शेतकरी आघाडीमुळे यंदाची विधानसभा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, “येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही,
तर शेतकऱ्यांची आघाडी असेल.
कष्टकरी, शेतकरी जे जास्त कष्ट करतात त्यांची ही आघाडी असेल.
९ ऑगस्टला संभाजीनगर येथे आम्ही सभा ठेवली आहे.
त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल,
तर त्याचं स्वागत आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच आहे,
असे मत बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू हे सध्या महायुतीमध्ये आहेत.
मात्र त्यांचे आघाडीमध्ये खटके उडत आहे.
आपली नाराजी देखील त्यांनी उघडपणे जाहीर देखील केली आहे.
लोकसभेमध्ये अमरावतीच्या जागेवरुन भाजप विरुद्ध बच्चू कडू
अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने बच्चू कडू नाराज होते.
त्यामुळे आता आगामी विधानसभेमध्ये महायुतीमधून एक्झिट घेत
नवीन आघाडी स्थापन करण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत.
शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि दिव्यांग यांच्या समस्यांवर काही मुद्दे मांडत होतो.
त्यासाठी १० ते १५ आमदार एकत्र आले.
परंतु सत्ताधाऱ्यांकडे यावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही यावेळी मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात ते पाहून निर्णय घेऊ.
Read also: https://ajinkyabharat.com/the-cut-of-capturing-the-indian-watchtower-was-revealed/