महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही
आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी,
महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आलं. त्या तिनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू
आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही.
मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित
शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत,
असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू
शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार
संजय राऊत यांनी केली. महायुतीची मंत्रीमंडळाची बैठक पार
पडली, त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही, अशा बातम्या
समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात
आला, तेव्हा त्यांनी खोचक टीका करत हे उत्तर दिलं.
कुणाचा पायपोस कुणाच्याही गळ्यात-पायात नाही अशी
परिस्थिती आहे. पहिल्यापासूनच हे सरकार एकमेकांच्या छाता़ावर
बसलं आहे. अमित शाहांना फक्त महाराष्ट्र आणि मराठी
माणसाला कमजोर करायचं आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना,
राष्ट्रवादी तोडली आणि त्याच उद्देशाने महायुतीचं हे सरकार
तोडलं.असं सरकार एकदिलाने काम कसं करेलं ? असाही प्रश्न
राऊतांनी विचारला.
Read also: https://ajinkyabharat.com/sambhaji-bhidekandu-praises-pm-modi/