महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही
आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी,
महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
आलं. त्या तिनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू
आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही.
मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित
शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत,
असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू
शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार
संजय राऊत यांनी केली. महायुतीची मंत्रीमंडळाची बैठक पार
पडली, त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही, अशा बातम्या
समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात
आला, तेव्हा त्यांनी खोचक टीका करत हे उत्तर दिलं.
कुणाचा पायपोस कुणाच्याही गळ्यात-पायात नाही अशी
परिस्थिती आहे. पहिल्यापासूनच हे सरकार एकमेकांच्या छाता़ावर
बसलं आहे. अमित शाहांना फक्त महाराष्ट्र आणि मराठी
माणसाला कमजोर करायचं आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना,
राष्ट्रवादी तोडली आणि त्याच उद्देशाने महायुतीचं हे सरकार
तोडलं.असं सरकार एकदिलाने काम कसं करेलं ? असाही प्रश्न
राऊतांनी विचारला.
Read also: https://ajinkyabharat.com/sambhaji-bhidekandu-praises-pm-modi/