आंबेडकरी विचारसरणीच्या मंडळींवरील खोटे गुन्हे रद्द करा

आंबेडकरी विचारसरणीच्या मंडळींवरील खोटे गुन्हे रद्द करा

दहिगाव, तेल्हारा:

दहिगाव  येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावात लावलेल्या पंचशील व निळ्या झेंड्यांची

काही जातीय प्रवृत्तीच्या लोकांनी विटंबना केली. याविरोधात आंबेडकरवादी

Related News

नागरिकांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मात्र, नंतर या तक्रारीचा राग धरून, संबंधित मंडळींवर राजकीय दबाव टाकून खोटे

गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

या पार्श्वभूमीवर तेल्हारा पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता गावात कोंबिंग

ऑपरेशन राबवले आणि गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे नोंदवले गेले.

या घटनेमुळे गावातील आंबेडकरवादी जनतेत भीतीचं वातावरण आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे आणि महिला आघाडी अध्यक्षा

आम्रपाली खंडारे यांनी गृहमंत्री व अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन पुढील मागण्या केल्या:

  • दहिगाव येथील आंबेडकरवादी नागरिकांवरील सर्व खोटे गुन्हे त्वरित रद्द करावेत.

  • तेल्हारा पोलीसांनी राबवलेलं कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावं.

  • खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांविरोधात चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे गजानन गवई, मनोहर बनसोड, किशोर जामनिक, अक्षय तायडे,

राजू मुंधवने, अमोल कलोरे, शंकरराव राजुस्कर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/patur-naib-tehsildarna-threatening-case/

Related News