विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला.
दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक झालेले दिसले.
याच मुद्द्यावरून विधान परिषदेच्या कामकाजात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेले दिसले.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अंबादास दानवेंची खडाजंगी झाल्याने 15 निटांसाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आज जोरदार बाचाबाची झाली.
अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, ”सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत?
मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम
असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? तुम्हाला (दिशा सालियन मृत्यू प्रकरण)
चौकशी करायची तर करा. एसआयटी नेमलेली आहे. काही अडचण नाही. मात्र, एका व्यक्तीच्या विरोधात चार-चार जणांनी बोलायचं का?
असा प्रश्न दानवे यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन मध्येच बोलले, त्यानंतर दानवेंचा पारा चढला. मी तुमच्याशी बोलत नाही, मला बोलूद्या.
सभापती महोदय मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबवायला हवा. नाहीतर मी जातो, त्यानाच बोलूद्या म्हणत दानवे संतापले.
ही हमरी-तुमरी एवढी वाढली की अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली.
मात्र, तेव्हाढ्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.