केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह
सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडे आगामी विधानसभा
निवडणुतीसाठी 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. रामदास
आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात
का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीत
जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना भाजप रामदास
आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडणार का?
ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “रिपब्लिकन पक्ष देशभर
वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त रिपब्लिकनच्या भरवशावर
आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव
झाला होता. त्यासाठी पक्ष वाढविण्याचा विचार बाबासाहेबांनी
व्यक्त केला होता. आमच्या रिपब्लिकन पक्षात मोठ्या प्रमाणात
गटबाजी मुरलेली आहे. एकेकाळी 9 खासदार होते. वंचित बहुजन
आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते माझ्यासोबत
आले असते तर जास्त मंत्री रिपब्लिकनचे असते. मी एकटाच मंत्री
झालो. पण एकमत होत नाही. त्यामुळे नुकसान होते. माझी इच्छा
आहे सगळे रिब्लिकन एकत्रित यावे”, असं आवाहन रामदास
आठवले यांनी केलं आहे. तसेच “प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या
माध्यमातून निवडणूक लढवली, पण त्यांचे उमेदवार निवडून आले
नाहीत. त्यांना मान्यता मिळाली नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर
यांनी मांडलं.
Read also: https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-untimely-rains-in-mumbai/