अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलांसह घरात झोपलेली असताना दिनांक १८ जुलै रोजी रात्री सुमारास यशवंत विनायक वानखडे (वय ३५, रा. बोचरा, ता. अकोट, जि. अकोला) हा तिच्या घरात घुसला आणि वाईट उद्देशाने तिचा हात पकडत विनयभंग केला. पीडित महिलेने आरडाओरडा केल्यावर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या घटनेवरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भादंवि २०२३ मधील कलम ७४ अन्वये गुन्हा (गु. र. नं. ३४४/२०२५) दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास पथक तयार करून फिर्यादीचे १८३ बीएनएसएस अंतर्गत जबाब न्यायालयात नोंदविले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले.
या प्रकरणात केवळ २४ तासांत दोषारोपपत्र तयार करून दिनांक १९ जुलै २०२५ रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर जलद आणि ठोस कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोहेकॉ. वासुदेव ठोसरे, शिवकुमार तोमर, पोकॉ. सागर नागे, गोपाल जाधव आणि महिला पोलीस कॉ. स्वाती भेंडेकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
या प्रकरणातील पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.