अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला एक कबुतर वाहतुकीच्या गर्दीत मृत्यूच्या छायेत सापडला होता. मात्र, कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि करुणा या मुक्या जीवासाठी संजीवनी ठरली.
पोस्ट ऑफिस चौकात भरधाव वाहनांची वर्दळ सुरू असतानाच अचानक रस्त्यावर पडलेला कबुतर उडू शकत नव्हता. कोणत्याही क्षणी वाहनाखाली चिरडला जाण्याची भीती निर्माण झाली होती. याच वेळी चौकात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक महिला पोलिस अश्विनी चौधरी यांच्या लक्षात ही बाब आली.
क्षणाचाही विलंब न करता त्या जखमी कबुतराला रस्त्यावरून उचलले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर कबुतरावर उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी त्याला पशुसंवर्धन दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवार असल्याने दवाखाना बंद असल्याचे समोर आले.
Related News
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
प्रतिनिधी : आकाश डोंगरे
बोरगाव मंजू येथील श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालयात नुकत्याच रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम महा...
Continue reading
अखेर, अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण! प्रा. प्रमोद वामनराव तसरे, भोवते लेआउट, अमरावती, यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात आचार्य पदवी...
Continue reading
राष्ट्रवादी अजित Pawar गटाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का; ठाणे महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश
मुंबई/ठाणे: राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू अ...
Continue reading
Nagpur MIDC मध्ये मोठा अपघात : पाण्याची टाकी फुटून 3 कामगारांचा मृत्यू, 8 जण जखमी; औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न
राज्याची उपराजधानी असलेल्या Nagpur ...
Continue reading
Rinku Rajguru Emotional Moment: अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या 'आशा' सिनेमाचा प्रीमियरवेळी आईसोबत भावनिक क्षण व्हायरल; पाहा तिच्या ...
Continue reading
धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कळंब तालुक्यातील ईटकुर गावात अवघ्या ३६ वर्षांच्या तरुणाने...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील जेष्ठ पत्रकार, संपादक, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक किशोर जयराम अवचार यांचा सन्मान करण्यासाठी भिम गीत गायनाच्या माध्यमातून आदरांजली कार्यक्रमाचे आयो...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. उपचारासाठी कबुतराला मेडिकलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथेही आवश्यक वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. अखेर, माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित करत महिला पोलिस अश्विनी चौधरी यांनी त्या जखमी कबुतराला आपल्या निवासस्थानी नेऊन त्याला आश्रय दिला.
कर्तव्याच्या पलीकडे जाऊन दाखवलेली ही करुणा आणि संवेदनशीलता आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘पोलीस म्हणजे केवळ कायदा नव्हे तर माणुसकीही’ हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/huge-treasure-of-thousands-of-years-found-in-the-sea-a-big-shock-for-archaeologists/