अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.