अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
IPL 2026: विराट कोहलीने अनुष्का शर्मा कडे फ्लायिंग किस; व्हायरल व्हिडिओ
नीममध्ये सापडला खास घटक, जो कॅन्सर कोशिकांच्या वाढीस मंदावतो
Anurag Dobhal आणि रितिका चौहान यांच्या घरात बाळाच आगमन; फॅन्समध्ये आनंदाची लाट
Microcheating : नात्यातील “लहान फसवणूक” आणि त्याचा परिणाम
Kiara Advani च्या मातृत्वानंतर आयुष्य बदलले, नवे दृष्टिकोन मिळाले
Drinking Coffee Daily for 14 Days: शरीरावर काय होतात बदल?
उन्हाळ्यात टरबूजावर चिमूटभर मीठ का टाकावे? जाणून घ्या कारणे
Rajat Dalal ने लग्न करून सुरू केला जीवनाचा नवीन अध्याय; शेअर केले लग्नाचे फोटो
Splitsvilla 16 : आयुष शर्माला शोमधून बाहेर पाठवले, सुझान मिळाली थ्रोनवरील ताकद
Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुखचा डबल झटका; दोन स्पर्धक घराबाहेर
भोंदू बाबा खरातच्या फार्महाऊसवर काळ्या मांजरी; अघोरी विधींचा संशय उभा राहिला
युद्ध न करताच पाकिस्तान बेहाल; गॅस सिलिंडरचे दर 5 हजारांपार!
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.
