अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
7 मनमोहक क्षण! मुंबईच्या आकाशात झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य, मरीन ड्राइव्हवर निसर्गाची अद्भुत जादू
IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 10 भन्नाट Memes व्हायरल! श्रेयस अय्यरवर संतप्त चाहत्यांचा जोरदार निशाणा
24 जूनच्या वादळाने उडवले घराचे छप्पर; अकोल्यातील बाहेकर कुटुंब उघड्यावर
हुबेहूब रुपाली चाकणकरच… दीपाली सय्यदचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल ; 5 फोटोत पाहा!
AI चा धक्कादायक गैरवापर! लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीचा छळ; 500 कॅब, बनावट हनीमून फोटो आणि डोहाळेजेवणाच्या आमंत्रणाने उडाली खळबळ
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!
7.5 रिश्टरच्या भूकंपानंतर व्हायरल झालेला वडिलांचा फोटो खरा की खोटा? जाणून घ्या 5 मोठी सत्ये
मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित हत्याकांड! 400 CCTV फुटेजमधून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
मुंबई सोडून बेंगळुरूत करिअर! मराठी तरुणाने सांगितले 7 धक्कादायक अनुभव; पैसा मिळाला पण एकटेपणाची भीतीही वाढली
राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठी घडामोड; 2 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
राज ठाकरेंचा जैन शिष्टमंडळाला स्पष्ट इशारा ‘कार्पेट टाका, पांढऱ्या पट्ट्या कशाला?’ ; 5 मोठे मुद्दे
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.

