अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूरी शेतशिवारात शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात
जाणूनबुजून तणनाशक फवारून सव्वा एकरावरील सोयाबीन पीक नष्ट केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे तपास सुरू आहे.
Related News
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
आयुष्मान कार्डमुळे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
गजानन प्रल्हादराव हरसुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बहिणीच्या मालकीच्या शेतात ३ जुलै रोजी सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.
दरम्यान तणनाशकाच्या फवारणीमुळे शेतातील उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून,
फिर्यादीने अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
यासंदर्भात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/daruwari-karvadhivat-akolidat-vain-bar-bandi-bandi-bandicha-bandicha-gesture/