महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामुळे महानगरपालिकेने आजपासून (१५ एप्रिल) शहरात दर पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Related News
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
याआधी दर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता.
सध्या प्रकल्पात २२.८३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून, ही आकडेवारी गेल्या
वर्षीपेक्षा थोडी जास्त (०.५४%) असली तरी, उन्हाळ्याचे वाढते तापमान
लक्षात घेता आगामी काळात जलसाठा लवकरच आटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गतवर्षी १५ एप्रिल रोजी २६.४५% जलसाठा होता, तर यंदा तो २६.९९% आहे.
मात्र पाण्याची मागणी वाढत असल्याने नगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.”
नागरिकांनी पुढील सूचना आणि वेळापत्रकासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे,
तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-satpir-darga-hatavinyavarun-violence/