विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
गटाचे नेते शरद पवार आणि शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या
भेटीगाठी घेत आहेत. नाशिकमधील बड्या नेत्याच्या मुलाने राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे
वरिष्ठ नेते नरहरी झिरवळ त्यांचे पुत्र गोकुळ यांना दिंडोरी विधानसभा
मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
अशातच गोकुळ झिरवळ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात
चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर नरहरी झिरवळ यांनी मध्यमांशी
संवाद साधलात तेव्हा गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर
नरहरी झिरवळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील यांच्या
भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होतं. जयंत पाटील माझे नेते आहेत.
त्यांचा जाऊन सत्कार कर आशा सूचना दिल्या होत्या, असं नरहरी झिरवळ
म्हणालेत. गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ झिरवळ हे शरद पवार
गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यावर झिरवळांनी प्रतिक्रिया
दिली आहे. तिथे त्याला विचारलं बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत.
म्हणून त्याने निवडणूक लढविण्याचं सांगितलं. त्यामुळे संभ्रम तयार झाला.
पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे,
असंही झिरवळ म्हणालेत.
Read also: https://ajinkyabharat.com/lalbaugcha-raja-charani-lean-along-with-chief-minister-shinde-family/