उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या
दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक
केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी
अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट
आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत
असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत
नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा
खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी तिरोडा येथे आयोजित
कार्यक्रमात लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने
शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी
जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. यावेळी तिरोडा येथे आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव
स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्यापूर्वीच काही अज्ञात
व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की
निश्चितपणाने या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे
मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत.
आमच्या पक्ष या ठिकाणी वाढतो त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर
फाडले असतील त्यांचा मी निषेध करतो असे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/sonya-chandila-punha-jhalaali/