अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघात; २३८ प्रवासी होते सवार

अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघात; २३८ प्रवासी होते सवार

टेकऑफ दरम्यान इंजिन फेल, रहिवासी इमारतीवर कोसळले विमान; बचावकार्य सुरु

अहमदाबाद : गुरुवारी सकाळी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान

टेकऑफ करताना अपघातग्रस्त झाले. या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानात एकूण २२८ प्रवासी

Related News

आणि १२ क्रू मेंबर्स असे एकूण २३८ लोक होते. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे दुर्घटनाग्रस्त झाले.

टेकऑफनंतर विमान शहरातील मेघानीनगर परिसरातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर प्रचंड आग लागली.

या अपघातामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून आकाश काळ्या धुराने व्यापले आहे.

सीआयएसएफने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची शेपटी टेकऑफदरम्यान धावपट्टीला घासून गेली होती, हीही दुर्घटनेची शक्यताप्राप्त कारण आहे.

बचावकार्य सुरु:

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस, आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करत आहेत.

मृत्यू किंवा जखमींच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

महत्त्वाचे मुद्दे:

  • बोईंग 787 ड्रीमलाइनर लंडनसाठी होते रवाना

  • टेकऑफदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अपघात

  • २३८ लोक होते विमानात

  • रहिवासी इमारतीवर कोसळले विमान

  • मोठ्या जीवितहानीची शक्यता, अधिकृत माहिती प्रतीक्षेत

संपूर्ण देशात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/patur-talukya-vyyacha-kahrh-shirla-goegav-aani-chondhi-yeh-animal-dishyu/

Related News