केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी
दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती
दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे
आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे
अहिल्यानगर नामकरण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव
अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र
सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने
राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन
आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल
मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर
अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.
आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण
अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती
सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची
प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/rules-for-driving-scooters-and-motorcycles-changed/