केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी
दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती
दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे
आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे
अहिल्यानगर नामकरण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव
अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र
सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने
राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन
आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल
मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर
अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.
आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण
अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती
सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची
प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/rules-for-driving-scooters-and-motorcycles-changed/