मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी
औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास
करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर
यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न
घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी
नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली हा
दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा, मुक्तीचा दिवस
असल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र
प्रवर्तन दिनानिमित्त 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान
दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि
महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन
दिन साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. महाराष्ट्र आणि
देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत
असतात. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की,
आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द
अनुयायांकडून आकारण्यात येणारा टोल माफ करावा, असे या
पत्रात म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ratan-tata-became-his-heir/