RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या
पूजा खेडकर प्रकरणानंतर असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस असल्याचा दावा
RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. एवढेच नाही तर
या 22 अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट UPSC FILES नावाने
सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखिल विजय कुंभार यांनी समोर आणली आहे.
याबाबत UPSC आयोगाला पत्र लिहून, या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी,
या अधिकार्यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून
कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.
या 22 मधील पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील देखील एकूण चार अधिकारी
असल्याचा दावा केला जातोय. इतकच नाही तर हे सर्व आधिकारी राज्यात
IAS, IPS आणि IRS म्हणून कार्यरत असल्याचेही विजय कुंभार यांनी सांगितलंय.
अलीकडे उघडकीस येणारे गैरप्रकार लक्षात घेता या सर्व प्रकाराचा फटका
प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो आहे. या संपूर्ण प्रकारात काही प्रकरण असे देखील
आहे की त्यांनी दिव्यांग असल्याचे बनावट सर्टिफिकेट जमा केले आहे
आणि त्यानंतर त्यांचेच काही व्हिडिओ समाज माध्यमांवर नाचताना दिसले आहेत.
इतका गंभीर प्रकार हा अद्याप कुणाच्याही लक्षात आला नाही, असं म्हणता येणार नाही.
तर हे प्रकरण काहींच्या लक्षात आले असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक
याकडे दुर्लक्ष केल्या असल्याचं पण बोलायला जागा आहे.
यात अनेक पदांची अशाच प्रकारे निवड झाल्याचेही विजय कुंभार म्हणाले.
एकट्या महाराष्ट्रात अशा प्रकारची चार प्रकरण उजेडात आली आहे.
ही लोक राज्यात काम करत नसली तरी ते राज्याबाहेर काम करत आहेत.
त्यामुळे यूपीएससीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यात हस्तक्षेप करून
वेळीच यावर कारवाई करून योग्य ते पाऊल उचलावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/who-is-the-chief-ministerial-face-of-mahavikas-aghadi-nana-patoleni/