Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची
मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान क्रेडिट कार्डवरुन दिल्या जाणाऱ्या कर्जाची
Related News
संगारेड्डी, तेलंगणा | १७ एप्रिल २०२५ —
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
अमीनपूर परिसरात राहणाऱ्या रजिता नावाच्या एका ४५ वर्षीय...
Continue reading
पुणे | १७ एप्रिल २०२५ –
स्वारगेट बस स्थानकावर फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या तरुणीवरील बलात्कार
प्रकरणाचा समरी अहवाल आता समोर आला असून, त्यातून आरोपी दत्ता गाडे
याच्या विकृत...
Continue reading
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना
अर्थसहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये किसान क्रेडिट
कार्डवरुन होणाऱ्या वित्तपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भतील माहिती समोर आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती. वेळोवेळी या योजनेत बदल करण्यात आले आहेत.
आता निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.
आता केसीसी मिळणारं कर्ज 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशभरात 7 कोटी 72 लाखांपेक्षा अधिक आहे.
या शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात होणाऱ्या वित्त पुरवठ्यात वाढ झाली आहे. मार्च 2014 मध्ये केसीसीवर
4.26 लाख कोटींच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं. तर, डिसेंबर 2024
पर्यंत ही रक्कम 10.05 लाख कोटींवर पोहोचली आहे.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे बँकांकडून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं वित्त पुरवठा केला जातो.
यामध्ये बियाणं खरेदी, औषध खरेदी याच्यासह पिकाच्या काढणीवेळी लागणारं भांडवल उपलब्ध करुन
देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. 2019 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या
आतापर्यंत शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 7 टक्क्यांनी दिलं जायचं.
आता याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कर्ज परतफेड केल्यास
3 टक्के व्याज माफ केलं जातं. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजानं पैसे उपलब्ध होतात.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन जुन्या नियमांप्रमाणं 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम विनातारण दिलं जातं.
शेतकऱ्यांना कमी त्रासात वित्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी केसीसी फायदेशीर ठरणार आहे.
केंद्र सरकारनं 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 127290 कोटींची तरतूद केली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि योग्य वेळेत परतफेड केली, अशांना फायदा होईल. किसान क्रेडिट कार्डच्या एकूण
सदस्यांच्या 10 टक्के म्हणजेच जवळपास 80 लाख सदस्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल.
Read more news here : https://ajinkyabharat.com/champions-trophy-2025-pakistan-semifanla-pohochala-afghanistan-madatila-avka-paus/