पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने
शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली.
अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर होणारा परिणाम लक्षात घेऊन,
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
विद्यालयाने मासिक सभेत ठराव घेतला की, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी आणि सदस्यांनी घरा बाहेर पडताना हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा.
रस्ते अपघात कोणतीही पूर्वसूचना न देता घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते.
त्यामुळे हेल्मेट परिधान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून,
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,
सावित्रीबाई फुले विद्यालयाने नागरिकांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पातूर तालुक्यातील नागरिकांनी
यापासून प्रेरणा घेत हेल्मेट वापरण्याची सवय लावावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सुरक्षित वाहतुकीचा संदेश देणारी ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chhawa-india-pak-samanyacha-bata-sunday-insicor-earnings-lack/