Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या
आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेटनं पराभूत केलं आहे.
भारतापुढं आता पाकिस्तानंच आव्हान आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचवेळा लढत झाली आहे.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
यामध्ये कोणता संघ वरचढ ठरलाय हे पाहिल्यास भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं.
पाकिस्ताननं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 पैकी 3 सामन्यात पराभूत केलं आहे.
भारतानं पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केलं आहे. भारतानं 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला साखळी सामन्यात पराभूत केलं.
मात्र, त्याच स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला.
भारत आणि पाकिस्तान दुबईत 28 वेळा आमने सामने आले. ज्यामध्ये पाकिस्ताननं भारताला 19 वेळा पराभूत केलं.
तर, भारतानं पाकिस्तानला 9 वेळा पराभूत केलं आहे.एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान 135 वेळा आमने सामने आले आहेत.
यामध्ये पाकिस्ताननं भारताला 73 वेळा पराभूत केलं. भारतानं पाकिस्तानला 57 वेळा पराभूत केलं आहे.
यावरुन पाकिस्तानचं वनडेमध्ये भारतावर वर्चस्व राहिल्याचं दिसून येतं. रविवारी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागल्याचं दिसून येतं.
MORE NEWS HERE