मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा
मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा
पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड)
तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
‘मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,’
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
‘The 50’ मध्ये मोठा वाद: अरबाज पटेलने शिव ठाकरेला मारली थप्पड; शोमधून तात्काळ बाहेर
रिअॅलिटी शो ‘The 50’ मध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट आणि वाढत चाललेले ...
Continue reading
अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले.सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच,
ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमावरून ही टीका केली.
‘आम्ही आधीच म्हटले होते, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात,
खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ
‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत.
कोस्टल रोडवर ‘हाजी अली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेले पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे,’
असे आदित्य यांनी लिहिले आहे.
‘आमचे सरकार असते तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड २०२३ मध्येचसंपूर्ण तयार झाला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या,’ असा दावाही त्यांनी केला.सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळी या दरम्यान पुलाचे सांधे मजबूत राहावेत,यासाठी रस्त्याच्या काही भागावर गेल्या वर्षी केलेले मास्टिक आवरण (डांबरीकरण) अद्याप कायम असल्याचे गुरुवारी समोर आले.यानंतर मुंबई महापालिकेची कोंडी झाली आहे. यावर महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूपपूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.READ MORE NEWS