महाराष्ट्रात GBS चा कहर सतत वाढतांना दिसत आहे. या आजाराची लागण झालेल्यांची
संख्या 200 च्या पार गेली आहे. त्यामुळे राज्यात एकच चिंतेचं वातावरण आहे.
आरोग्य विभागाच्या मते, एकूण रुग्णांपैकी 180 रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे.
Related News
मोफत महाआरोग्य शिबिर..
RCB च्या विजयाचा आनंद साजरा करताना चाहत्यांचा मृत्यू
बेंगलोर मध्ये आरसीबी (RCB) ची विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू…
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची
रोहित पवारांना अमोल मिटकरी यांचा टोला – “हेलिकॉप्टरमधून उतरा, ग्राउंड लेव्हलवर या!
गोरखपूरमध्ये पतीने पत्नीचा गळा चिरून केला खून…
लखनऊ – कानपूर रॅपिड रेल प्रकल्पाला हिरवा कंदील, एलडीएकडून NOC मंजूर
पिंजर येथे जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क सलाईनवर….
मानसून कधी देणार उत्तराखंडमध्ये दस्तक?
संगीता जाधव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड;
शिवाजी नगर शेत शिवारात जंगली जनावराचा हल्ला
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण…
या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
राज्यातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अर्धवट शिजवलेले अन्न किंवा कोंबडीचे मांस खाऊ नये,
असे आवाहन केले आहे. पुण्यात कोंबड्यांच्या मांसामुळे जीबीएस
पसरल्याची चर्चा असताना जीबीएसचा धोका टाळण्यासाठी अन्न पूर्णपणे शिजवा,
असं आवाहन अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलंय.
तर अन्न पूर्ण शिजवल्याने जीबीएसचा धोका टाळण्यासाठी मदत होऊ शकते.
दुसरीकडे पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवेरे यांनी देखील अन्न पूर्ण शिजवून खाण्याचा सल्ला दिला आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम नेमका काय?
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील औषध विभागाच्या डॉक्टरांच्या मते,
हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत.
ज्यामध्ये सर्दी, खोकला आणि जास्त ताप येतो. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराची
रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/devachaya-dararatch-bhavikachi-loot-shirdi-saibabanya-darshanasathi-galya-ghadla-ghadla-blow-type/