अकोला, दि. 15: पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे मागील ११ महिन्यांपासून शेतकरी हमीभावाच्या कायद्याच्या
मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून,
त्यांचे आमरण उपोषण गेल्या ५१ दिवसांपासून सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा.
- सरसकट कर्जमाफी द्यावी.
- शेतमालासाठी योग्य हमीभाव निश्चित करावा:
- सोयाबीन: ₹6,000 प्रति क्विंटल
- हरभरा: ₹8,000 प्रति क्विंटल
- कापूस: ₹10,000 प्रति क्विंटल
- तूर: ₹12,000 प्रति क्विंटल
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात.
- पिक कर्जासाठी सिबील अट रद्द करावी.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने निश्चित करावा.
- प्रत्येक हंगामासाठी (रब्बी, खरीप) प्रति एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरून जीएसटी (GST) रद्द करावी.
शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी
आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आणि शेतकरी हिताच्या धोरणांवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-makar-sankranti-the-women-of-mhatla/