अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या
धोकादायक वळणावर ८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.
बहिरमहून संग्रामपूरकडे जाणारी एमएच 28 बीडब्ल्यू 0145 क्रमांकाची चारचाकी गाडी
Related News
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
वळणावरून थेट रस्त्याच्या कडेला उतरून नाल्यात पडली. गाडी नाल्यातून पलटी होऊन शेतात गेली,
मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या मित्रपरिवाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.
पहिल्या नजरेत हा अपघात पाहून काहींनी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला.
मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली गेली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
वणी वारुळा येथील वळण हा अत्यंत धोकादायक असून, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.
रात्रीच्या वेळी या वळणावर वाहन चालवणे कठीण होते, ज्यामुळे चालकांचा ताबा सुटून अशा दुर्घटना घडतात.
प्रशासनाने या वळणावर उपाययोजना करून अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सदर अपघातानंतर पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
वाहन संग्रामपूर येथील असल्याचे उघड झाले आहे. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,
नागरिकांनी अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, धोकादायक वळणांवर अधिक प्रकाश व्यवस्था व आवश्यक संकेतस्थळे बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/one-person-seriously-injured-after-being-attacked-by-a-stranger-treatment-started-immediately/