अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या
धोकादायक वळणावर ८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.
बहिरमहून संग्रामपूरकडे जाणारी एमएच 28 बीडब्ल्यू 0145 क्रमांकाची चारचाकी गाडी
Related News
मोदींना अपशब्द बोलणाऱ्या मुलीच्या आईची थेट मागणी; म्हणाली, ‘तिला दत्तक घ्या…’
संकष्टी चतुर्थीला बनला खास ग्रहयोग! ‘या’ 5 राशींवर गणरायाची विशेष कृपा
मोठी बातमी! नोकरी सोडल्यावर PF मधून किती पैसे मिळणार? 75% रक्कम मिळेल, 25% अडकणार
वळणावरून थेट रस्त्याच्या कडेला उतरून नाल्यात पडली. गाडी नाल्यातून पलटी होऊन शेतात गेली,
मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या मित्रपरिवाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.
पहिल्या नजरेत हा अपघात पाहून काहींनी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला.
मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली गेली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
वणी वारुळा येथील वळण हा अत्यंत धोकादायक असून, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.
रात्रीच्या वेळी या वळणावर वाहन चालवणे कठीण होते, ज्यामुळे चालकांचा ताबा सुटून अशा दुर्घटना घडतात.
प्रशासनाने या वळणावर उपाययोजना करून अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सदर अपघातानंतर पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
वाहन संग्रामपूर येथील असल्याचे उघड झाले आहे. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,
नागरिकांनी अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, धोकादायक वळणांवर अधिक प्रकाश व्यवस्था व आवश्यक संकेतस्थळे बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/one-person-seriously-injured-after-being-attacked-by-a-stranger-treatment-started-immediately/

