बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,
त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.
देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच
Related News
LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? सरकारचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास ठेवू नका
देशभरात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरत होती की, घरगुती LPG
Continue reading
मोठी बातमी! युद्धविरामाचे संकेत; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांची मोठी घोषणा, जगभरात दिलासा
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये एक मोठी आणि दिलासादायक घडामोड स...
Continue reading
‘The 50’ विजेता शिव ठाकरेसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी; ट्रॉफी घेऊन भेट दिली, शेतकऱ्याला मिळाले ₹50 लाख – प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी प्रेरणादायी क्षण
रिअॅलिटी शोच्या दुनियेत आपल्...
Continue reading
‘आउट ऑफ ऑफिस’ थीमने Lakme Fashion Week : अनीत पड्डाचा शोस्टॉपर लूक ठरला रॅम्पचा हायलाइट
फॅशनच्या दुनियेतला सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा सोहळा मानला जाणारा
Continue reading
अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘
Continue reading
आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत.
त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे.
त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.
या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड
येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे.
त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.